दिवस इतके बदललेत की आता कुठल्या गोष्टीबद्दल आपल्यात भावनाच शिल्लक राहिल्या नाहीत, सणांचा आनंद नाही, युद्धाचं दुःख नाही, भरभराटीचं सुख नाही, कितीही मिळालं तरी तृप्ती नाही. आयुष्य यांत्रिक झाली आणि आपण आपल्या पुढच्या पिढीच्याही नकळत तेच हातात देण
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण डोन्ट वरी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवी गोष्ट, एक नवा आनंद! Story Junction Marathi Podcast वर आजची स्टोरी खऱ्या आयुष्यावर आधारित आहे; आता तुम्ही म्हणाला कुणाच्या ? तर प्रत्येकाच्या! हि फेस प्रत्येक सर्
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण याचीच परतफेड म्हणून आम्ही घेऊन आलोय एक भन्नाट Podcast Series, 'The Last chapter'!! याशिवाय आजचा दिवस आपल्यासाठी फार विशेष आहे, कारण आज स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टला एक वर्ष पूर्ण झालंय आणि शून्यापासू
सचिन डोक्यात राग घेऊन घराबाहेर पडला खरा पण पुढे काय? ते म्हणतात ना, तळ्यातल्या बेडकाला समुद्रातील अडचणींची कल्पना नसते; त्याप्रमाणेच सचिनलाही बाहेरच्या जगाची मुळीच कल्पना नाही. इथे जेवढे चांगले लोक आहेत त्याहून कैकपट विक्षिप्त, क्रूर आणि निर्दय
स्वप्नांना ध्येय बनवून त्यांच्यामागे धावणं उत्तमच, पण तडकाफडकी निर्णय घेऊन आपण काही अनभिज्ञ अडचणींना निमंत्रण देत असतो. सचिननेही तेच तर केलं, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता इथे आला. या नव्या शहराने शहराने त्याला गोंजारलं, थोपटलं, राहायला एक
मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंत की सचिनला राघवने कशाप्रकारे वाचवलं आणि फायनली सचिनला राहण्यासाठी घरही मिळालं. आयुष्याच्या वळणावर बऱ्याचदा अशा अडचणी समोर उभ्या राहतात तेव्हा वाटतं की बस, आता स्वतःला संपवावं. तेव्हा जरा थांबायला हवं आणि एकदा, फक
गोष्ट जसजशी पुढे जातीये गुंता आणखीनच वाढत जातोय. राघव असा का वागतोय? सायली बिचारी गोड मुलगी आता कुठे जाणार? आणि सचिन यावर काही करणार की नाही?? मैत्रीत चढ-उतार तर येतातच पण इथे त्यामागचं नक्की कारण काय? तेच कळायला मार्ग नाही. असे अनेक प्रश्न आपल
मित्रांनो, आता आपण या सिरीजच्या शेवटच्या भागात आहोत. जर तुम्ही द लास्ट चॅप्टरचे यापूर्वीचे 5 एपिसोड्स ऐकले नसतील तर आधी ते ऐका जेणेकरून तुम्हाला हा भाग कळेलही आणि या सिरीजची पूर्ण मजा घेता येईल. जर तुम्ही या आधीचे एपिसोड्स ऐकले असतील तर मागच्या
प्रेम... कुणी माणसांवर करावं, कुणी प्राण्यांवर तर कुणी आपल्या कामांवर! प्रेम कुणावरही असो, अनुभव मात्र खूप देतं; कधी हळवा आनंद देतं तर कधी बोचणारे दुःख, कधी आयुष्याच्या सागरात हेलकावे खात-खात लांबवर घेऊन जातं तर कधी क्षणार्धात बुडवून सगळं संपवू
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बाहेगावांवरून येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन सेंटर्सला थांबवलं जात होतं. त्या काळात अनेकांनी काही नवनवीन अनुभव घेतले. हा एपिसोड म्हणजे आपल्या एका मित्राला क्वारंटाईनमध्ये आलेला असाच एक आगळावेगळा अनुभव! आपला हा मित
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. काही कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले तर काही आणखीनच दुरावले. मात्र या सर्वांपलीकडे काही कुटुंब अगदी उध्वस्तही झाले. अशाच एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. सुखी, आनंदी असणाऱ्या या कुटुंबाच्या सुखाला नकळत
शेतकऱ्याचं नशीब निसर्गावर अवलंबून असतं. जगाला अन्न पुरवणारा हा शेतकरी निसर्गाने साथ दिली नाही तर स्वतःच उपाशी राहतो. आजच्या गोष्टीतील शेतकऱ्याला सद्यस्थितीत निसर्गाने तर साथ दिली पण वेळेने नाही. रात्रंदिवस कुटुंबासोबत शेतात राबलेला हा शेतकरी सु
रोजच्या कमाईवर स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यक्ती लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावून बसतो आणि नाईलाजाने कुटुंबाला सोबत घेऊन गावचा रस्ता धरतो. जगण्याची नवी आशा मनात घेऊन गावची वाट पायी तुडवत हे कुटुंब निघालंय. पण ही वाट त्यांना एका वेगळ्याच वळण
'लॉकडाऊनच्या गोष्टी' सिरीजमधील ही तिसरी गोष्ट! टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाजा आलाच असेल की ही एका लग्नाची गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न व्हायचंय ते कपल आहे आजच्या पिढीतलं, ज्यांना पारंपरिक विवाह सोहळ्यात होणारा अनेक गोष्टींचा अपव्यय टाळावा असं
दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आ
लॉकडाऊनच्या गोष्टींमधील ही पहिली स्टोरी आहे एका कपलची, ज्यांचं अरेंज मॅरेज झालंय. हे दोघे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे आहेत. पण त्यांच्या याच स्वभावांमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नात्यात एक आश्चर्यकारक बदल घडतो, पण तो चांगला की वाईट हे
एक व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन सैरभैर धावतोय, त्याला माहितीये थांबला तर संपला! पण असं काय लागलंय त्याच्यामागे आणि का तो त्याच्यापासून पळतोय? हे जाणून घेण्यासाठी ऐका आमचा आजचा पॉडकास्ट मरण्याच्या क्षणभर आधी कळलं… काही चुका माणसाला आयुष्यभर कळत न
गप्प बसून अन्याय सोसणाऱ्याला आपण कोण आहोत हे आठवण करून देणारी आमची तिसरी स्टोरी…पण तुम्ही माणूस नाही!!" ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्
आपलं मन हे फारच चंचल असतं, त्याला स्थैर्य म्हणून कधी नसतंच. असंच एका तरुणाचं मन एका सुंदर तरुणीवर येऊन ठेपलंय आणि त्याचं महत्वाचं कारण आहे पाऊस! पावसात चिंब भिजलेली ती अनोळखी सुंदर मुलगी पाहून हा तरुण तिला दूर घेऊन गेला, तिच्या सोबत चहा प्यायला
आम्ही सादर करतोय आमची पहिली स्टोरी, "दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!"एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावू
आम्ही सादर करतोय आमच्या पहिल्या वहिल्या गोष्टीचा ट्रेलर जीचं नाव आहे दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज